-
Genre:History
-
Originally Published:
-
Hardcover:
-
Language:Marathi
Overview
‘भारत की बर्बादी तक जंग रहेगी ‘ म्हणणारे, अफजल गुरूचा जयजयकार करणारे, याकुब मेननला आपला हिरो समजणारे देशद्रोही, आम्ही आंबेडकरांच्या विचारांचा लढा लढत आहोत. असे सांगत लोकांच्या डोळ्यात धूळफेक करतात. समाजाच्या वेदनेने हळहळणारे स्वप्नातही देशहिताचाच विचार करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खरे कसे होते हे सांगणारा सांकृतिक वार्तापत्राचा राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेषांक .
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मातरण करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ख्रिश्चन व मुस्लिम धर्माच्या पुढाऱ्यांनी आग्रह धरला की, बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसह आमच्या धर्मात यावे. परंतु डॉ. आंबेडकर कोणत्याही मोहाला बळी पडले नाहीत. त्यांनी आपल्या मनाचा कौल ऐकला. मी कोणत्याही अराष्ट्रीय धर्माचा स्वीकार करणार नाही असे म्हणून त्यांनी बौध्द धर्माचा स्वीकार केला. कारण राष्ट्रभक्ती त्यांच्या अणूरेणूत भिनलेली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या साम्यवादाचा कडाडून विरोध केला, तेच साम्यवादी आज ‘जय भीम लाल सलाम’ अशा घोषणा देत भारतीय जनतेची दिशाभूल करीत आहेत. डॉ. बाबासाहेबांचे साम्यवादासंबंधी नेमके काय विचार होते आणि फाळणी ज्या धर्माच्या आधारावर झाली, त्यावेळी मुस्लिम धर्मासंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहून ठेवले आहे हे समजण्यासाठी, तसेच अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंबंधीच्या अनेक घटना जाणून घेण्यासाठी २६ जानेवारी २०१७ ला प्रसिध्द होणारा अंक.
Average customer rating
There are no reviews yet.